Activities

सभासद अपघात विमा योजना :-

हंगाम २००८-०९ पासून सर्व सभासदांचा प्रत्येकी रु़ १. ०० लाखाचा वार्षिक अपघाती विमा उतरविला आहे़ आतापर्यंत २० सभासदांच्या वारसांना प्रत्येकी रु़ १. ०० लाख याप्रमाणे एकुण रु़ २०. ०० लाख वाटप करुन त्यांचे कुंटूबियांना सहकार्य केले आहे व यापुढेही केले जाणार आहे़ कारखान्याचा सभासद अपघातामध्ये मयत झाल्यास त्यांचे कुंटूबियांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी कारखान्याचे अंकौंट विभागाकडे विमा क्लेमसाठी आवश्यक ती कागदपत्रे सादर करावीत़

सभासद साखर वाटपः-

कारखान्याच्या सभासदांचे हित डोळयासमोर ठेवून आर्थिक नुकसान सोसून रु़ २२/- प्रति किलो सवलतीचे दराने सभासदांना साखर वाटप करीत आहोत़ यापुढे सभासदांना साखरेसाठी कारखान्यावर वारंवार येण्याची गरज भासू नये व त्यांना सहा महिन्याची साखर एकदम घेऊन जाता यावी यासाठी कारखान्याने तीस किलोच्या आकर्षक बॅगची छपाईकरुन घेतली आहे़ सभासदांच्या सोयीसाठी दोन ठिकाणी साखर वाटप केंद्र सुरु असून कारखान्याचे युनिट नं. १ अंकुशनगर या केंद्रावरुन कारखाना पुर्व, कारखाना पश्चिम व अंबड विभागातील सभासदांना व कारखान्याचे युनिट नं. २ (सागर) तिर्थपुरी या केंद्रावरुन तिर्थपुरी,घनसावंगी, राणी उंचेगांव व कुंभार पिंपळगांव विभागातील सभासदांना प्रत्येक महिन्याला सवलतीच्या दराने साखर मिळत आहे़

ऊस विकास योजने अंतर्गत विविध योजना :-

माती परिक्षण सुविधा :- कारखाना स्थळी वसंतदादा शुगर इन्स्टिटयुट, पुणे यांचे तांत्रिक सहकार्याने सन २०१० पासून अंद्यावत माती परिक्षण प्रयोगशाळा (सॉईल लॅब) उभारली आहे़ यामधून शेतकर्‍यांना विनामुल्य माती परिक्षण करुन देऊन ऊस पिकास आवश्यकतेनुसार खताची मात्रा देणेची शिफारस करण्यात येते़ अहवाल काळात ४४९ माती नमुने विनामुल्य तपासून खताची मात्रा देणे बाबत शिफारस पत्रे संबंधीत शेतकर्‍यांना दिलेली आहेत़
कारखाना कार्यक्षेत्रातील प्रत्येक गावातील निवडक शेतकर्‍यांचे जमिनीतील माती नमूने संकलीत करुन सर्व्हेक्षण व पृथःकरण करुन त्या गावाचा जमीन सुपिकता निर्देशांक व अन्न घटकाचे सरासरीप्रमाण यामध्ये नत्र, स्पुत्र्रद, पालाश, सेंद्रीय कर्ब, पी़ एच़ कंक्टटीव्हीटी इत्यादीचा तपशिल ‘व्ही़ एस़ आय़ पुणे’ यांचे तांत्रिक सहकार्याने निश्चीत करुन त्याआधारे गावाची जमीन आरोग्य पत्रिका (सॉईल हेल्थ सर्टीफिकेट) तयार करण्याचे काम पूर्ण झाले असून उपलब्ध अन्न घटकाचे सरासरी प्रमाण व त्यानुसार गावासाठी वापरावयाच्या सरासरी खत मात्रेचे प्रमाण दर्शविणारे फ्लेक्स बोर्ड प्रत्येकगावाच्या मध्यवर्ती ठिकाणी लावण्यात येतील़ ज्यामुळे संबंधित गावाचा जमिनीचा सुपिकता निर्देशांक सुधारणे व अन्न घटकांचे प्रमाणानुसार खत मात्रा देणे सोईचे होईल, हे मी येथे नमुद करीत आहे़

गांडुळ खत प्रकल्प:-

कारखाना स्थळी प्रतिमाह १०० मे़ टन क्षमतेचा गांडुळ खत निर्मिती प्रकल्प आहे़ यामधून तयार होणारे उत्तम प्रतिचे गांडुळ खत ना-नफा ना-तोटा तत्वावर ५० किलोची बॅग रु़ २५०/- प्रती बॅगप्रमाणे व ४० किलोची बॅग रु़ २००/- प्रती बॅगप्रमाणे रोखीने ऊस उत्पादक शेतकर्‍यांना दिले जाते़ सन २०२१-२२ मध्ये १९६५२ बॅग गांडुळ खताचे उतपादन झाले असून १८०३५ बॅग गांडुळ खताची विव्‌रात्री झालेली आहे़ शेतकर्‍यांनी या खताचा जास्तीत जास्त वापर ऊस पिकासाठी करावा.
शेतकरी प्रशिक्षण, चर्चासत्र व मेळावे :-
ऊस उतपादक शेतकर्‍यांना ऊस लागवड, खते, पाणी व्यवस्थापन,खोडवा संगोपन,ठिबक सिंचन इत्यादीचे प्रात्यक्षिकासह मार्गर्दान वेत्र्ले जाते़ वसंतदादा शुगर इन्स्टिटयुट, पुणे या संस्थेच्या ”शेतकरी ज्ञानयाग” करीता शेतकरी व चर्चा सत्रासाठी अधिकारी व कर्मचारी यांना प्रशिक्षणासाठी पाठविण्यात येते़ ऊस उत्पादकता आणि साखर उतारा वाढीसाठी कार्यक्षेत्रात सुधारीत जातींचे ऊसाची लागवड वाढविणे, जमीनीतील सेंद्रिय कर्ब व्यवस्थापन व सुपिकतेसाठी हिरवळीची खते, कंपोस्ट खते वापरणे, पाचट आच्छादन करणे, माती परिक्षणावर आधारीत खत मात्रा देणे यामध्ये बेसल डोस, दुय्यम व सुक्ष्म अन्न द्रव्याचा वापर करणे, सुक्ष्म सिंचन (ठिबक सिंचन) वापर करणेबाबत कारखान्यामार्फत वेळोवेळी मार्गदर्शन केले जाते़ कारखान्यामार्फत ‘शाश्वत ऊस उत्पादनाचे आधुनिक तंत्रज्ञान’ ही ऊस लागवडीची अंद्ययावत माहिती देणारी सचित्र पुस्तिका तयार करुन कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादक शेतकर्‍यांना मोफत वाटप करण्यात आली आहे़ तसेच कारखाना कार्यक्षेत्रात विभागनिहाय शेतकरी मेळावे नियमीत घेण्यात येतात़ तज्ञांचे मार्गदर्शनानुसार शेतकरी बांधवांनी ऊस पिकाचे संगोपन करावे़
कर्मयोगी अंकुशराव टोपे सर्वाधिक ऊस उत्पादक गौरव पुरस्कार :-
कारखाना कार्यक्षेत्रामध्ये सुधारीत व नवीन जादा साखर उतारा व उत्पादन देणार्‍या ऊस जातींची लागवड व्हावी़ ऊस पिकांचे बाबतीत स्पर्धात्मक वातावरण निर्माण व्हावे, यासाठी एकरी जास्तीत जास्त ऊस उत्पादन घेणार्‍या शेतकर्‍यांना प्रोत्साहनपर ”कर्मयोगी अंकुशराव टोपे सर्वाधिक ऊस उत्पादक गौरव पुरस्कार” हंगाम २०१६-१७ पासून देण्यात येत आहे़ यामध्ये प्रथम पुरस्कार प्राप्त शेतकर्‍यास रु़ २१,०००/- रोख, द्वितीय पुरस्कार प्राप्त शेतकर्‍यास रु़ १५,०००/- रोख, व तृतीय पुरस्कार प्राप्त शेतकर्‍यास रु़ ११,०००/- रोख व सन्मानपत्र, स्मृतीचिन्ह देऊन गौरविण्यात येत आहे़ या योजनेमध्ये जास्तीत जास्त शेतकर्‍यांनी सहभागी होऊन या पुरस्काराचे मानकरी व्हावे.

कर्मयोगी अंकुशराव टोपे सर्वाधिक ऊस तोड व वाहतुक गौरव पुरस्कार :-

ऊस तोड व वाहतुक कंत्राटदार व मजुर यांनी जास्तीत जास्त ऊसाची तोडणी व वाहतुक करावी याकरीता स्पर्धात्मक वातावरण निर्माण व्हावे यासाठी ट्रक/ट्रॅक्टर/छोटे ट्रॅक्टर/ टायरबैलगाडी/केन हार्वेस्टर करीता जास्तीत जास्त ऊस तोड व वाहतुक करणार्‍यांना प्रोत्साहनपर ”कर्मयोगी अंकुशराव टोपे सर्वाधिक ऊस तोड व वाहतुक गौरव पुरस्कार” गळीत हंगाम २०१६-१७ पासून देण्यात येतो़ यामध्ये पुरस्कार प्राप्त वाहन मालक/कंत्राटदार /मजुर यांना प्रथम क्रमांकास रु़ १५००/- , द्वितीय क्रमांकास रु़ १०००/- बक्षीसाची रोख रक्कम, सन्मानपत्र व स्मृतीचिन्ह देऊन गौरविण्यात येते़ तेंव्हा ऊस तोड व वाहतुक कंत्राटदार / मजुर यांनी जास्तीत जास्त ऊस तोड व वाहतुक करुन या पुरस्काराचे मानकरी व्हावे, असे मी आवाहन करीत आहे़

ऊस तोडणी व वाहतुक मजुर विमा :- आपले कारखान्याकडून नियमीत ऊस तोड व वाहतुक यंत्रणेचा विमा उतरविला जातो़ गळीत हंगाम२०२१-२२ मध्ये मा. श्री. विखे पाटील विमा योजने अंतर्गत ऊस तोडणी व वाहतुक मजुरांचा अपघाती विमा उतरविला असून अहवाल सालात १३६ मजुरांना रु़ २७,७०,५४६/- सामुहिक विमा योजनेतून रक्कम मिळवून देऊन त्यांचे कुंटूबियास सहकार्य आहे़ तसेच अपघातामध्ये बैल/मजुर मयत होणे, बैल निकामी होणे, कोपी जळणे अथवा अन्य कारणामुळे नुकसान झालेल्या मजुरास सामुहिक विमा योजनेतून रक्कम मिळवून देऊन सहकार्य करीत आहोत़

वृक्षारोपन व संगोपन :- समृध्द पर्यावरणाचे संरक्षण होणेसाठी आपले कारखान्याने युनिट नं. १ अंकुशराव येथे ३३३३३ व युनिट नं. २ (सागर) तिर्थपुरी येथे ५३११० अशी एकुण ८६४४३ झाडे लावली आहेत़ यामध्ये करंज, काशिद, सिसम, रेन ट्री, लिंब, कांचन, चिंच, आंबा, नारळ, पेरु, सिताफळ अशी जंगली वृक्ष व फळबाग वृक्ष लागवडी बरोबरच विविध शोभिवंत वृक्षांचा समावेश आहे़ पर्जन्य वर्ष २०२२ मध्ये युनिट नं. १ अंकुशराव येथे १२७६ व युनिट नं. २ (सागर) तिर्थपुरी येथे -३७०० अशी एकुण दोन्ही युनिटकडे ४९७६ नवीन फळबाग, जंगली व शोभिवंत झाडे लावण्याचे काम सुरु आहे़ लावलेली झाडे पुर्ण जगली पाहिजेत यासाठी झाडांना ठिबक सिंचन व तुषार सिंचन केले आहे़ सभासद शेतकर्‍यांनी वृक्ष लागवड योजनेमध्ये सहभागी होऊन आपापल्या शेतात उपयोगी फळबाग वृक्ष लागवड करुन त्याचे संगोपन करावे, असे मी आवाहन करीत आहे़

आरोग्य सुविधा व वैद्यकीय मदत :-
कारखाना कार्यस्थळावर कारखान्याचे कामगार, ऊस तोड व वाहतुक कंत्राटदार, मजुर यांचे आरोग्यासाठी ‘समर्थ आरोग्य केंद्र’ दवाखाना कार्यान्वीत केला आहे़ यामधून कारखान्याचे अपघातग्रस्त रुग्णांवर मोफत तर कारखाना कामगार व त्यांचे कुंटूब व ऊस तोडणी वाहतुक कामगारांच्या कुंटूबियांवर सवलतीच्या दराने औषधोपचार केले जातात़ गरजू रुग्णांना तातडीची आरोग्य सेवा उपलब्ध व्हावी यासाठी रुग्णवाहीका सुविधा पुरविली जाते़

संगणक विभाग :-

आपले कारखान्याने सर्व विभाग संगणकीकृत केले अंसून व्हर्च्युअल गॅलक्सी इन्फोटेक प्रा़ लि़ , नागपुर यांनी विकसीत केलेली वेब बेस ईआरपी सॉफ्टवेअर
(संगणक प्रणाली) गळीत हंगाम २०२०-२१ पासून वापरात येत आहे़ सदरची ईआरपी सॉफ्टवेअर प्रणाली ही क्लाउड बेस असल्याने इंटरनेटद्वारे याचे कामकाजकेले जाते़ यामध्ये ऊस उत्पादक शेतकरी, ऊस तोड व वाहतुक मुकादम यांना ऊस टनेजची माहिती एसएमएसद्वारे मिळते़ ऊस तोडणी प्रोग्रामसाठी ऑन लाईन मोबाईल अप व वजन काटा प्रणाली चालू केलीआहे़ यामध्ये कोणासही ऊस नोंद अगर अन्य तपशिलामध्ये फेरबदल करता येत नाही़ तसेच वायरलेस कनेवस्र्टीव्हीटीचा वापर करुन कारखान्याचे युनिट नं. २ (सागर) तिर्थपुरीकडील संगणकीय डाटा युनिट नं. १ अंकुशनगरचे सर्व्हरला सेट्रलाईज केला आहे़ कामकाजाच्या सोईचे दृष्टीने सीसीटीव्ही यंत्रणा व व्हीडीओ कॉन्फरन्सींग सिस्टीम बसविली आहे़

कामगार संबंध व कामगार कल्याण योजना :- कारखान्याचे कामकाजामध्ये कारखान्याचे सर्व अधिकारी, कर्मचारी व कामगार यांचे सहकार्य मिळत असून त्यांचा आपल्या कारखान्याच्या प्रगतीमध्ये मोलाचा वाटा आहे़ सर्वजन आपुलकीने व निष्ठेने काम करतात़ कामगार हा कारखान्याचा एक महत्वाचा घटक समजून कामगार व त्यांच्या कुंटूबियांच्या सेवेकरीता कारखाना कार्यस्थळावर उत्तम दर्जाची घरे,पिण्याचे शुध्द पाण्यासाठी आऱ ओ़ प्लॅन्ट, पिठाची गिरणी, सांस्वृत्र्तीक व क्रीडा मंडळ, कामगार कल्याण मंडळ, भजनी मंडळ, सहकारी कामगार पतपेढी, गणो उद्यान, बालोद्यान, इत्यादी सुविधा उपलब्ध करुन दिलेल्या आहेत़ प्रत्येक वर्षी कामगारांना बोनस, सानुग्रह अनुदान, गणवेष दिले जातात़ तसेच कर्मचारी ग्रुप ग्रॅच्यईटी स्कीम, कर्मचारी ग्रुप पर्सनल अॅक्सीडेंट बेनिफीट पॉलीसी, कर्मचारी ग्रुप लिव्ह इन-वॅत्र-मेंट पॉलीसी, ववर्स्र्समन कॉम्पेन्सेशन पॉलिसी इत्यादी विविध पॉलीसीज घेतल्या आहेत़ यामुळे ग्रच्युईटी, रजेचा पगार , अपघात झाला तर अर्थसहाय्य मिळणे सुलभ झाले आहे़ तसेच महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाचेवतीने गरजू व पात्र कर्मचार्‍यांच्या मुला-मुलीना शैक्षणिक शिष्यवृत्ती, त्यांच्या कुंटूबियांना वैद्यकीय मदत मिळवून देण्यात येते़

कर्मचारी प्रािक्षण व ट्रेनिंग प्रोग्राम :-
कारखान्यामध्ये काम करणार्‍या कामगारांचे कौशल्य वाढावे, त्यांच्यामध्ये अधिक गुणवत्ता निर्माण व्हावी व पर्यायाने दुरुस्ती व देखभाल खर्च कमी व्हावा यासाठी कारखाना स्थळी विविध तांत्रिक तज्ज्ञांचे मार्गर्दानाखाली औद्योगीक सुरक्षा व आरोग्य, कौशल्य विकास, ताण-तणाव व्यवस्थापन, एनर्जी सेव्हींग, पंप वापर व मेन्टेनन्स, एअंर कॉम्प्रेसर वापर व मेन्टेनन्स, बेअंरींग वापर व मेन्टेनन्स, वेल्डींग रॉड वापर व मेन्टेनन्स, उत्पादकीय प्रव्‌रात्रीया, , पॅन बॉयलींग, कॉस्ट कंट्रोल, मॅनेजमेंट इन्फॉर्मेशन सिस्टीम इत्यादी विविध विषयावर कर्मचार्‍यांचे ट्रेनिंग प्रोग्राम घेण्यात आले असून आजही घेतले जात आहेत व यापुढेही वेळोवेळी आयोजीत केली जाणार आहेत़ यामुळे काम करतांना कर्मचार्‍यांना याचा फायदा होत आहे़
शैक्षणिक सुविधा :-
कर्मचारी व परिसरातील शेतकर्‍यांच्या मुला मुलींच्या शिक्षणासाठी मत्स्योदरी शिक्षण संस्थेच्यावतीने कारखाना स्थळी बालवाडी, इंग्लिश स्कुल, पार्थ प्राथमिक शाळा, छत्रपती शिवाजी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, कस्तुरबा गांधी बालीका विद्यालय, एमसीव्हीसी (व्यावसायिक अभ्यासक्रम), डेअरी कॉलेज, आय़ टी़ आय़ इत्यादी शैक्षणिक सुविधा निर्माण केल्या आहेत़